आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली- जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथील पैनगंगा नदावरील जुन्या पुलावरून गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजेच्य सुमारास सवना येथील एका कुटुंबातील तिघांनी आत्महत्या करण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. या घटनेत पत्नी व मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे. पती थोडक्यात बचावला. कनेरगाव नाका येथील ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे सदर कुटुंब प्रमुखाला वाचविण्यात यश आले.
विठ्ठल अमृतराव नायक (60) असे वाचलेल्या व्यक्तीचे नाव आहे. उमा देशमुख (वय-24, रा.पान कनेरगाव) आणि शकुंतला विठ्ठल नायक (वय-50) असे मृत दोघींची नावे आहेत. हे सर्व एकाच कुटुंबातील असून, विठ्ठल व शकुंतला हे पती-पत्नी सवना येथील रहिवाशी असून त्यांची मुलगी उमा ही पान कनेरगाव येथील आहे. घरगुती वादातून सर्वांनी कनेरगाव नाका नदीच्या पुलावरून उडी घेतली. त्यात आई आणि मुलीचा मृत्यू झाला. या कुटुंबाने दारुड्या मुलगा-भावाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. विठ्ठल नायक यांचा मुलगा दारू पिवून त्यांना त्रास देत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्रस्त होवून या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलले.
याबाबत गोरेगाव पोलिसांकडून अधिक माहिती देण्यात आली नाही. घटनेची माहिती कनेरगाव नाका चौकीत दिल्यानंतर कनेरगाव चौकीचे सुनील खिल्लारे, मोहन धाबे, विजय महाले, विकास राठोड आदींनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य केले. तर ही घटना वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत घडल्याने वाशिम पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.