आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीच्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून दोन मित्रांनी तरुणावर केले चाकूचे १४ वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - पूर्ववैमनस्यातून तीन मित्रांमध्ये झालेल्या वादात दोघांनी एका तरुणाच्या डोक्यावर गिटार वाद्याने, तर पोटात चाकूने वार केले. या घटनेत आनंदनगरातील १८ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर घडली. या प्रकरणी शहर पोलिसांत मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल झाला. जखमीवर गोदावरी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.  

 


जय अशोककुमार दुधाणी (१८ रा. आनंदनगर, जावळे हॉस्पिटलमागे, भुसावळ)असे जखमीचे नाव आहे. त्याचे एका तरुणीशी असलेल्या प्रेमसंबंध होते. या कारणावरून दुधाणीचे मित्र तथा संशयित दत्तू जयसिंग राजपूत व नीलेश चंद्रकांत ठाकूर यांनी त्याच्याशी यापूर्वी वाद घातला होता. यानंतर वाद मिटून तिघांची पुन्हा मैत्री झाली. मात्र, रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारात तिघांमध्ये पुन्हा वाद झाला. संशयित दत्तू राजपूत व नीलेश ठाकूर यांनी जय दुधाणीला आनंदनगरातील घरापासून दुचाकीवर बसवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आणले. या ठिकाणी शाब्दीक वाद वाढला. त्यामुळे दोघांनी जयवर चाकू व गिटार वाद्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जय गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला गोदावरी रुग्णालयात हलवले. रात्री उशिरा दत्तू राजपूत व नीलेश ठाकूर यांना शहर पोलिसांनी अटक केली. दरम्यान, प्रेमसंबंधावरून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

 

वाढदिवसाचे कारण
संशयित राजपूत व ठाकूर यांनी एका मित्राचा वाढदिवस असल्याचे कारण सांगून जयला घराजवळूनच दुचाकीवर बसवून नेले होते. तसेच रात्री तिघेही मित्र पार्टी करण्यासाठी डी.एस.ग्राऊंडवर बसले. यावेळीच अचानक गिटार व चाकूने जयवर दोघांनी हल्ला चढवला. आरोपींनी चाकू व गिटारने तब्बल १४ वार केल्याने जय गंभीर जखमी झाला. दोघे संशयित हल्ल्यानंतर पसार झाले. त्यांना पोलिसांनी पहाटे अटक केली.