आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाभारतामध्ये धृतराष्ट्रचे मंत्री विदुर यांनी विविध नीती सांगितल्या आहेत. या नीती केवळ त्या काळातच उपयोगी नव्हत्या तर आजही यांचे खूप महत्त्व आहे. या नीतींचा दैनंदिन जीवनात अवलंब केल्यास मनुष्याचे जीवन सुखी आणि प्रसन्न राहू शकते. विदुर नीतीनुसार ज्या मनुष्याजवळ या 6 गोष्टी असतात, तो अत्यंत सुखी आयुष्य जगतो. खालील श्लोकाच्या माध्यमातून विदुराने या सहा गोष्टी सांगितल्या आहेत...
आरोग्यामानृण्यमविप्रवासः सद्धिर्मनुष्यैः सह स्मप्रयोगः।
स्वप्रत्यया वृत्तिरभीतवासः षड् जीवनलोकस्य सुखानि राजन्।।
पहिली गोष्ट -
निरोगी (स्वस्थ) शरीर -
जीवनात सदैव सुखी राहण्यासाठी शरीर तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. शरीराला एखादी व्याधी असेल तर तुम्ही व्यवस्थित काही खाऊ-पिऊ शकत नाहीत. अशा अवस्थेमध्ये तुम्ही जीवनातील अनेक सुखांपासून वंचित राहू शकता. जर तुम्हाला सामान्य आजार असेल तर त्याचेही त्रास सहन करावा लागतो. आजार मोठा असेल तर दवाखाना, औषधी इ. गोष्टींमध्ये पैसा आणि वेळ खर्च होतो. निरोगी शरीर असणारा व्यक्ती कोणतेही काम करण्यास सक्षम असतो. गरज पडल्यास तो शारीरिक श्रम करू शकतो, याउलट रोगी व्यक्ती हे करू शकत नाही. यामुळे शरीर निरोगी असणे आवश्यक आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या श्लोकाचा सविस्तर अर्थ....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.