आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- लोकसभेत एमआयएमने शिवसेनेचा पराभव करत शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादला मोठा धक्का दिला. वंचित बहुजन आघाडीकडून लढणारे एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे 4 वेळचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. पण निकालानंतर शिवसेना नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
निवडणूक निकालादिवशी काही युवकांनी गोंधळ केला होता. ''माझ्या कार्यकर्त्यांमुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो'', असे इम्तियाज जलील म्हणाले.
"माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावे. तुम्ही चुकीचे वागलात तर मी वाचवायला येणार नाही", असा इशारा इम्तियाज जलील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. तसेच "शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आता राजकारण बंद करून शहराच्या विकासासाठी सोबत यावे असे आवाहनही यावेळी इम्तियाज जलील यांनी केले. माझे कार्यकर्ते चुकीचे काम करत असतील तर मला सांगा, मी दोनशे टक्के कारवाई करेन", असे आश्वासनही जलील यांनी दिले.
एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा विजय
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. या मतदारसंघात शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील, काँग्रेसकडून सुभाष झांबड आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव अशी चौरंगी लढत झाली. पण खैरे आणि जलील यांच्यात खरी फाईट होऊन जलील यांनी विजय मिळवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.