आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- योग गुरू बाबा रामदेव यांनी गृह मंत्री अमित शाह यांच्या नेशनल रजिस्टर ऑफ सिटिजंस(एनआरसी)वर संसदेत दिलेल्या स्पष्टीकरणाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "एनआरसी राष्ट्रीय सुरक्षा ठेवण्यासाठी गरजेचे आहे. याचे राजकारण होता काम नये. जर एखाद व्यक्ती देशात अवैधरित्या घुसला असेल, तर तो देशासाठी धोकादायक ठरू शकतो."
पुढे ते म्हणाले की, "आपल्या देशाची सुरक्षा करणे हे आपले कर्तव्य आहे. एनआरसी यासाठी फायद्याची ठरू शकते. हा सामाजिक आणि राजकीय मुद्दा नाहीये, त्यामुळे यावर राजकारण होता काम नये."
देशात एनआरसी लागू होईल- अमित शाह
बुधवारी संसदेत बोलताना अमित शाह म्हणाले होते की, "एनआरसी संपूर्ण देशात लागू केली जाईल. कोणत्याच धर्मालातील नागरिकांना घाबरण्याची गरज नाहीये. ही फक्त सगळ्यांना एनआरसीमध्ये आणण्याची प्रक्रिया आहे. ज्यांचे नाव ड्राफ्ट लिस्टमध्ये नसेल, त्यांना ट्रिब्यूनलमध्ये जाण्याचा हक्क आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.