आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या लाँगिंननंतर टेलीकॉम कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक कंपन्यांच्या नफ्यात घट झाली तर अनेक कंपन्यांचे दिवाळं निघल्यामुळे त्या विकाव्या लागल्या आहेत. पण जिओचा हा झटका फक्ट टेलीकॉम कंपन्यांनाच नाही तर केंद्र सरकारच्या खजिन्याला सुद्धा बसला आहे. जिओमुळे सरकारच्या खजिन्यात जवळपास 4400 कोटी रूपयांची घट झाल्याचे सरकारने नुकतेच संसदेत मान्य केले आहे.
कशाप्रकारे झाले नुकसान...सरकाने दिली संसदेत माहिती..
आर्थिक वर्ष 2017-18 दरम्यान टेलीकॉम क्षेत्रातून मिळणाऱ्या महसूलामध्ये जवळपास 22 टक्के घट झाली असल्याचे सरकारने संसदेत मान्य केले आहे. सरकारने म्हटले आहे की सर्व्हिस प्रोव्हायडर्सला सर्व्हिसच्या विक्रीतून होणाऱ्या मिळकतीमध्ये घट झाल्याने असे झाले आहे. सरकरा टेलीकॉम कंपन्यांना मिळणाऱ्या महसूलाचा एक हिस्सा परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम युसेज चार्ज (SUC) स्वरूपात वसुल करते. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओचे 25 डिसेंबर 2015 रोजी सॉफ्ट लाँज केले होते आणि सप्टेंबर 2017 मध्ये लोकांसाठी ही सुविधा लाँच करण्याच आली होती.
पुढे वाचा...एका वर्षात किती घटला महसूल...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.