आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून देशभरात गदारोळ सुरु आहे. यादरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या विधेयकाबाबत आपले मत मांडले आहे. या विधेयकाबाबत देशात विविध अफवा पसरवण्यात येत आहे. आम्ही कोणत्याही समुदायला लक्ष करत नसल्याचे नितीन गडकरी म्हणाले. इतर देशातील शीख, हिंदू, ख्रिश्चन, बौध्द, जैन समुदायाला देशात सामावून घेणे हा या विधेयकाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, "हिंदु, शीख, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन समाजातील लोकांना इतर कोणत्याही देशात स्थान न मिळाल्यास त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात येईल. आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही किंवा आम्ही कोणालाही पाकिस्तानात जाण्यास सांगत नाही. काळजी करण्याची काहीच नाही. अफवा पसरवल्या जात आहेत."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.