आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोविंदभाई श्रॉफ साहित्य नगरी - दिव्य मराठीच्या मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये पहिल्या दिवशी 'साहित्य ग्रामीण वास्तवापासून दूर आहे का?' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. बशर नवाज सभागृहामध्ये आयोजित या चर्चासत्रामध्ये ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा.रं.बोराडे, आमाराम लोमटे यांचा सहभाग होता. प्रा.रामचंद्र काळुंखे यांनी दोन्ही मान्यवरांना याविषयी बोलते केले. साहित्यामध्ये तुलना होऊ शकत नाही, माणसाला जाणवतं, भिडतं ते साहित्य असतं असे विचार यावेळी मान्य वरांनी मांडले. दोन्ही मान्यवरांनी ग्रामीण साहित्याविषयीची संकल्पना अधिकाधिक स्पष्ट करत, या विषयावर प्रकाश टाकला.
सविस्तर उद्याच्या (शनिवार) अंकात...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.