सोहराबुद्दीन चकमक प्रकरण: वंजारांसह पाच जणांच्या मुक्ततेचा निकाल कायम
दिव्य मराठी | Update - Sep 11, 2018, 05:55 AM IST
सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात मुंबई हायकोर्टाने गुजरात एटीएसचे माजी प्रमुख व राजस्थान, गुजरातच्या ४ इतर पोलिस अधिकाऱ्
-
नवी दिल्ली- सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात मुंबई हायकोर्टाने गुजरात एटीएसचे माजी प्रमुख व राजस्थान, गुजरातच्या ४ इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या निर्दोष मुक्ततेचा सीबीआय न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. न्या. ए.एम. बदर यांनी सोमवारी मुक्ततेच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या पाच याचिका फेटाळल्या.
सबळ पुराव्यांअभावी सत्र न्यायालयाने योग्य निर्णय दिल्याचे हायकाेर्टाने सांगितले. तसेच बहुतांश अधिकाऱ्यांवर आरोप निश्चित करण्यापूर्वी सरकारकडून परवानगी घेतलेली नसल्याचे कोर्टाने सांगितले. वंजारांसह गुजरातचेे राजकुमार पांडियन, ए.के. अमीन, विपुल अग्रवाल आणि राजस्थानच्या दिनेश एम.एन व दलपतसिंह राठोड यांची मुक्तता झालेली आहे.
More From National News
- तब्बल 6 कोटी दारूड्यांना व्यसनमुक्तीची हवी सुविधा; केंद्रीय सामाजिक न्याय विभाग मंत्रालयाचा अहवाल
- आसाम राज्याने स्थलांतरितांबद्दल मूळ देशांना एवढी वर्षे का कळवले नाही? तपास केंद्रांमध्ये मिळणाऱ्या वागणुकीबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता
- पुलवामा चकमकीत मिळाले हौतात्म्य; पाच राज्यांत 5 शहिदांना हजारो लोकांची सलामी