आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - आयसीसी आता २०२३ पासून क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये माेठा सकारात्मक बदल करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याच पुढाकारातून मल्टी नॅशनल स्पर्धांच्या टायमिंगमध्ये माेठा बदलाची याेजना विचाराधीन आहे. यातून आता २०२३ पासून २०२८ पर्यंत प्रत्येक वर्षी टी-२० चा आणि प्रत्येक तीन वर्षांनी वनडेच्या वर्ल्डकप आयाेजनाची आयसीसीने याेजना तयार केली. याच्या माध्यमातून क्रिकेटला चालना मिळेल आणि जगाच्या कानाकाेपऱ्यात क्रिकेटची लाेकप्रियता वाढेल, असा विश्वासही आयसीसीने व्यक्त केला. याच स्पर्धेच्या माध्यमातून स्वत:ची आणि यजमानांच्या क्रिकेट मंडळांनाही माेठी कमाई करून देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी आयसीसी ग्लाेबल मीडिया राइट्सच्या माध्यमातून आपला रिव्हेन्यू वाढवण्याची शक्यता आहे. आता प्रत्येक दाेन वर्षानंतर टी-२०चा आणि चार वर्षानंतर वनडेचा वर्ल्डकप आयाेजित केला जाताे. त्यामुळे आता या वेळापत्रकामध्ये लवकरच बदल केला जाणार आहे.
बीसीसीआयला उत्पन्नात घटची भीती: आयसीसीच्या या मल्टिनॅशनल स्पर्धेच्या टायमिंगमधील बदलाच्या याेजनाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काहीसा विराेध दर्शवला. याच्या माध्यमातून आपल्या प्रसारण हक्क कमाईच्या उत्पन्नामध्ये घट हाेण्याची भीती बीसीसीआयला वाटत आहे. कारण, प्रत्येक वर्षी आयसीसीच्या प्रीमियम स्पर्धांच्या दरम्यान माेठे ब्राॅडकास्टर्स प्रक्षेपण हक्कासाठी माेठा खर्च करण्यास पसंती दर्शवतील. तसेच द्विपक्षीय मालिकेच्या आयाेजनावरही हा खर्च हाेईलच. आतापर्यंत बीसीसीआयला टीम इंडियाच्या द्विपक्षीय मालिकेच्या माध्यमातून माेठी कमाई करता आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.