आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाभारतामध्ये असे अनेक पात्र आहेत, ज्यांच्या मृत्यूविषयी कधीही काही दाखवण्यातही आले नाही आणि सांगितलेही गेले नाही. आज आम्ही तुम्हाला महाभारतातील अशाच काही पात्रांविषयी सांगत आहोत...
असा झाला चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांचा मृत्यू...
महाभारतानुसार, भरतवंशी राजा शांतनूचे पहिले लग्न देवनदी गंगासोबत झाले होते. यांच्यापासून भीष्म यांचा जन्म झाला. गंगा निघून गेल्यानंतर राजा शांतनू यांनी सत्यवतीसोबत दुसरे लग्न केले. सत्यवतीला दोन पुत्र झाले - चित्रांगद आणि विचित्रवीर्य. हे दोघेही भीष्म यांचे सावत्र भाऊ होते.
महाराज शांतनूच्या मृत्यूनंतर भीष्म यांनी चित्रांगदला राजा बनवले. चित्रांगदने आपल्या पराक्रमाने सर्व राजांना पराभूत केले. त्यानतंर गंधर्वचा राजा चित्रांगद याने हस्तिनापूरवर हल्ला केला. गंधर्वाचा राजा चित्रांगद आणि हस्तिनापूरचा राजा चित्रांगद यांच्यामध्ये तीन वर्ष युद्ध चालले. गंधर्व राजा अत्यंत मायावी होता त्याने आल्या मायावी शक्तीने भीष्माचा भाऊ चित्रांगदचा वध केला.
क्षय रोगाने झाला विचित्रवीर्यचा मृत्यू
चित्रांगद राजाच्या मृत्यूनंतर भीष्म यांनी सत्यवतीच्या दुसरे पुत्र विचित्रवीर्यला हस्तिनापूरच्या गादीवर बसवले. तरुण झाल्यानंतर विचित्रवीर्य यांचे लग्न काशीच्या राजकुमारी अंबिका आणि अंबालिकासोबत लावण्यात आले. लग्नानंतर 7 वर्षांनी विचित्रवीर्यचा क्षय (टीबी) रोगाने मृत्यू झाला.
पुढील स्लाईड्सवर वाचा, कसा झाला धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंतीचा मृत्यू?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.