आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जपली जावी, त्यांना स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाचे महत्त्व कळावे यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीतानेच करावी, असा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे अनावरण उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हा ते बोलत होते. ते म्हणाले, चित्रपटगृहामध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत होत असते. देशासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती निर्माण व्हावी यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीतानेच झाली पाहिजे.
फलकही मराठीतच
मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे. यासाठी सर्व महाविद्यालयांच्या नावाचे फलक मराठीतच लावावेत, अशा सूचनाही महाविद्यालयांना देण्यात येणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.