आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - अटल बिहारी वाजपेयींचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. वाजपेयींच्या जीवनातील अनेक प्रसंग असे आहेत, ज्याची नेहमी चर्चा होते. पण अटल बिहारी वाजपेयी यांचे अविश्वास प्रस्तावाल उत्तर देतानाचे भाषण सर्वाधिक गाजले होते. अगदी त्यांच्या या भाषणाचे विरोधकांनीदेखिल कौतुक केले होते.
वाजपेयींनी संसदेत भाजपाला पाठिंबा नसल्याच्या आरोपाला उत्तर देताना अनेक प्रश्न उपस्थित केले होते. वाजपेयी म्हणाले की, आम्हाला एवढी मते मिळाली हे अचानक घडलेले नाही, तर हे आमच्या 40 वर्षांच्या परिश्रमाचे फळ आहे. आमचा पक्ष 365 दिवस काम करणारा पक्ष आहे. निवडणुकीच्या वेळी अचानक उगवणारा आमचा पक्ष नाही, असे वाजपेयी म्हणाले होते. आम्हाला केवळ थोड्या कमी जागा केला तर आरोपीच्या पिंजऱ्यात आम्हाला उभे केले. वाजपेयींच्या याच गाजलेल्या भाषणाची झलक आपण पाहणार आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.