आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- राज्यातील सत्ता गमावल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर घोटाळ्याचे आरोप होत आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस सरकारचे घोटाळे बाहेर काढू, असा इशारा दिला आहे. यानंतर फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ''आम्ही कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. राज्यातील जनतेला आमचा कारभार माहीत आहे. कोणीही कितीही आरोप करावेत. आमच्या काळात कोणाचीही अडवणूक केली नाही. कोणतेही प्रकल्प अडवले नाहीत. कसलाही भ्रष्टाचार केला नाही. कोणाला काय चौकशी करायचे ते करा,'' असे म्हणत फडणवीसांनी पलटवार केला आहे.
यावेळी विजयसिंह मोहिते पाटलांनीही राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. ''राष्ट्रवादीने आमच्या सदस्यावर काय कारवाई केली, याबाबत आम्हाला अद्याप माहिती मिळालेली नाही. पण, राष्ट्रवादीला कारवाई करायचीच असेल तर भाजपसोबत जाऊन रात्रीच्या अंधारात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांवर करावी आणि नंतर राष्ट्रवादीने मोहिते पाटील गटाच्या सदस्यांवर कारवाई करावी,'' असे खुले आव्हान विजयसिंह मोहिते-पाटलांनी दिले.
फडणवीस हे अकलू मध्ये दिवंगत शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याच्या आनावरणासाठी उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहित पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.