आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:स्थलांतरित मजुरांबाबतचा दृष्टिकोन बदलला पाहिजे

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ लीकडच्या काळात काश्मीर, पंजाब, गुजरात, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांवर हल्ले आणि पोलिसांच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. यापैकी एका राज्यात जिल्हा पोलिस कार्यालयाने एक अधिसूचना जारी केली आहे, त्यात या मजुरांना १५ दिवसांच्या आत त्यांची नावे आणि पत्ते स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यास सांगितले आहे. वेळेत तसे न केल्याने फौजदारी कारवाई होईल, असे म्हटले असून ५० मजुरांवर कारवाई करण्यात आली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे स्थलांतरित मजूर चोरी, घरफोडी आणि खून यांसारखे गुन्हे करत असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. गरिबीमुळे घर सोडून उदरनिर्वाह करणाऱ्या या मजुरांवर असे आरोप करून गुन्हेगारीकरण करणे योग्य नाही. आणि अशा दाव्यासाठी कोणताही स्पष्ट डेटा नाही. यूएनडीपीच्या अध्ययनानुसार, एखाद्या समाजात स्थलांतरित मजुरांची संख्या एक टक्का असेल तर त्या समाजाचा जीडीपी १.५% ने वाढतो. म्हणजेच स्थलांतरित मजूर आपली उपजीविका तर करतोच, पण त्या समाजालाही समृद्ध करतो. याचे कारण असे की, हे मजूर कमी दर्जाचे काम करतात आणि तेथील स्थानिक समाज स्वतःला चांगल्या व्यवसायात गुंतवून घेतो. बिहारमध्ये आज एखादे मूल जन्माला आले तर त्याचे दरडोई उत्पन्न दिल्ली/गोव्यात जन्मलेल्या मुलापेक्षा पाचपट कमी असेल. त्यामुळे पौगंडावस्थेनंतर तो उदरनिर्वाहासाठी मोठ्या शहरात जातो. आज बिहारी मजूर पंजाबची शेती सांभाळत आहेत आणि उत्तर प्रदेश-बिहारमधून स्थलांतरित मजुरांच्या कमतरतेमुळे आंध्र आणि तेलंगणातील भात गिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या मजुरांबाबत समाजाचा आणि शासनाचा दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा.