आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Emphasis On Further Improvement Of Basic Facilities In Small Towns | Article By Prof. Debolina Kundu

शहरी विकास:छोट्या शहरांतील मूलभूत सुविधा आणखी सुधारण्यावर भर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरी भारताला स्वच्छतेच्या पुढील स्तरावर नेणे हे अर्थसंकल्पाचे एक उद्दिष्ट आहे...

छोट्या शहरांतील मूलभूत सुविधांत सुधारणा करण्यासाठी अर्थसंकल्पीय प्रस्तावांमध्ये तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकार अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड स्थापन करेल, त्याचे व्यवस्थापन राष्ट्रीय गृहनिर्माण बँक करेल. त्यासाठी दरवर्षी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. हा निधी टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वापरला जाईल. त्यामुळे या शहरांमध्ये रोजगाराच्या संधी वाढतील. ते महानगरांसाठी प्रति-चुंबक म्हणून काम करतील, त्यामुळे मेट्रो शहरांवरील भार कमी होईल, ज्यांची लोकसंख्या आधीच त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे.

सर्व शहरे आणि गावांमध्ये मॅनहोल आणि मशीन होलऐवजी गटार आणि सेप्टिक टँक बनवले जातील. त्यामुळे शहरांमधील स्वच्छतेचे आव्हान पेलण्यास मदत होणार आहे. कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासही प्रोत्साहन दिले जाईल. मालमत्ता कर प्रशासनातील सुधारणा आणि रिंग-फेन्सिंग वापरकर्ता शुल्क शहरांना म्युनिसिपल बाँड्ससाठी अधिक अनुकूल बनवेल. शहरी पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी भांडवली बाजाराचा वापर केला जाईल. राज्ये आणि शहरांना शहरी नियोजन आणि विकासात्मक सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. शहरी नियोजन सुधारणांमुळे उद्याची शाश्वत शहरे निर्माण होण्यास मदत होईल, ही काळाची गरज आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत शहरांना अनुदानात वाढ करण्यात आली आहे. नवीन शहरांसाठी ४ हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कॉमन म्युनिसिपल सर्व्हिसेससाठीचे अनुदान हीदेखील नगरपालिका सेवांना वित्तपुरवठा करण्यासाठी एक नावीन्यपूर्ण आर्थिक यंत्रणा आहे. एमआरटीएस, मेट्रो प्रकल्प आणि अमृत २.० आणि एसबीएम २.० योजनांचे प्रोफाइल वाढवण्यात आले आहे. शहरांच्या पुनरुत्थानासाठी अटल मिशन-अमृतचे उद्दिष्ट पाणीपुरवठा, सांडपाणी, शहरी वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याचे आहे. यामुळे सर्व लोकांचे, विशेषतः गरिबांचे जीवनमान सुधारेल. अमृत २.० हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल आहे. सर्व शहरी कुटुंबांना नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. पाणीपुरवठा, सांडपाणी सुविधा आणि सेप्टेज व्यवस्थापन, पूरस्थिती कमी करण्यासाठी स्ट्रॉम वॉटर ड्रेन, पादचारी, मोटारचा वापर न करणारे, सार्वजनिक वाहतूक वापरकर्ते, सुविधांच्या देखभालीवर भर, पार्किंगची जागा, ग्रीन-स्पेसचा प्रचार, मुलांसाठी उद्याने इ. अमृत २.० चे ध्येय आत्मनिर्भर भारताद्वारे प्रेरित आहे, जे शहरांमधील प्रत्येक घरापर्यंत पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करते. हे सर्क्युलर इकाॅनाॅमीच्या माध्यमातून केले जाईल.

स्वच्छ भारत मिशन २.० चा फोकस स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाची गती वाढवणे आहे. शहरी भारताला स्वच्छतेच्या पुढील स्तरावर नेले जाईल. एसबीएम-अर्बन २.० अंतर्गत एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये गलिच्छ पाणी आणि द्रव कचऱ्याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जाईल आणि त्यावर प्रक्रिया केली जाईल. शहरी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी नवीन शहरांमध्ये अधिक गुंतवणुकीची आवश्यकता असेल. शहरे स्वावलंबी आणि वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी शहरी नियोजनात सुधारणा करण्यासाठी राज्ये आणि शहरांना प्रोत्साहन दिले जाईल.

प्रो. देबोलिना कुंडू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स {छोटी शहरे महानगरांसाठी प्रति-चुंबक म्हणून काम करतील, त्यामुळे मेट्रो शहरांवरील भार काही प्रमाणात कमी होईल.

बातम्या आणखी आहेत...