आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण ज्या भावाने देवाशी नाते जोडतो तसाच भाव मानवांबाबत ठेवला तर ज्यांना परमेश्वर शोधत आहे अशा लोकांच्या यादीत आपले नावही असेल. आपण भेदभाव करतो. दगडाच्या मूर्तीसमोर डोके टेकवतो आणि आजूबाजूच्या जिवंत लोकांत देव पाहत नाही. प्राथमिक वर्गात शिकवलेली एक जुनी गोष्ट आठवा. एका राजाने जादूगाराच्या मदतीने आपला जीव एका पोपटात ठेवला. आता कोणी पोपटाला मारले तरच राजा मरू शकत होता. आपण आयुष्यातील अनेक गोष्टी अशाच केल्याने त्रस्त आहोत.
आपण निराश होतो तेव्हा निराशेवर मात कशी करावी हे आपल्याला समजत नाही. तर निराशेचा आत्मा आसक्तीत असतो. आसक्ती म्हणजे काही मिळवण्याची तीव्र इच्छा. मग ते मिळवण्यासाठी काहीही (अगदी चुकीचेही) करावे लागले तरी हरकत नाही. निराशा केवळ आसक्तीच्या आधारावर जगते. आसक्ती थांबवा, निराशा आपोआप संपेल. आसक्तीत ठेवलेले निराशेचे प्राण पराभूत करता येत नसतील तर निराशेशी मैत्री करण्याचा प्रयोगही करता येईल. नीट बघा, समजून घ्या. निराशा जीवनात काही देऊ शकते, जे आपल्याला आशेनेही मिळणार नाही. निराशा म्हणते, माझी समज हाच माझा निरोप. लक्षपूर्वक ऐकाल तर ऐकू येईल, प्रत्येक निराशेत एक आवाज असतो, माझ्याकडून हारू नका, मी तुम्हाला जिंकवण्यासाठी आले आहे. Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.