आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१९३० च्या दशकात मिठावरील कराच्या विरोधात जवळपास एक वर्ष सत्याग्रह चालला. मिठाच्या आंदोलनात इंग्रजांनी हजारो लोकांना तुरुंगात टाकले. यानंतर आंदोलनातील महिलांची भूमिका झपाट्याने वाढली. त्यांना ना तुरुंगात जाण्याची भीती होती ना पोलिसांच्या लाठीमाराची. मिठावरील कराच्या विरोधात देशभरात महिलांनी प्रभातफेऱ्या काढल्या व रस्त्यावर मीठ तयार करून इंग्रजांना आव्हान दिले.
‘मिठाचा कायदा मोडला’, अशी घोषणा त्या उघडपणे देत असत. या आंदोलनाबद्दल स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी ‘इंडियन वुमेन्स बॅटल फॉर फ्रीडम’ या पुस्तकात लिहिले, मी मुंबईत मिठाचा कायदा मोडण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर गेले तेव्हा इंग्रजांच्या लाठीने जखमी झाले. पण, तिथे गर्दी वाढतच गेली. अनेक महिला नेत्या, गृहिणी भांडी घेऊन आंदोलनात उतरल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.