आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका मंत्र्याने संसदेत सांगितले की, २०२१ मध्ये देशात रोज ११५ (वा दर १२ मिनिटांनी एक) रोजंदारी मजुरांनी व ३८ बेरोजगारांनी (दर ३८ मिनिटांनी एक) आत्महत्या केली. सीएमआयईईच्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, नोकऱ्या शोधणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये वाढली आहे, परंतु औपचारिक क्षेत्रातील नोकऱ्या, ज्या कोरोनापूर्वी नऊ कोटी होत्या, त्या २०२२ मध्ये ८.४० कोटींवर आल्या आहेत. म्हणजेच बेरोजगारी शहरांमध्ये १०.९% आणि खेड्यांमध्ये ८.४% पेक्षा जास्त चिंताजनक पातळीपर्यंत वाढली आहे. पण राजकीय वर्ग तर सोडाच, सार्वजनिक चर्चेतही केवळ भावनिक मुद्दे गाजत होते, सार्वजनिक चिंतेचे नाही. संसद असो वा चर्चासत्र किंवा टीव्ही स्टुडिओ असो, मुद्दे हे आहेत : एखाद्या अभिनेत्रीने चित्रपटात कोणत्या रंगाचे कपडे परिधान केले, दशकांपूर्वीच्या स्वातंत्र्यलढ्यात कोणत्या पक्षाची भूमिका काय होती किंवा कोणत्या विचारसरणीच्या व्यक्तीचे चित्र एखाद्या राज्य विधानभवनात लावावे की नाही? सुप्रीम कोर्टाने छोट्या केसेस घ्याव्यात की नाही किंवा या न्यायाधीशांनी किती सुट्या घ्याव्यात? तवांगमध्ये चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीबाबत कोणत्या विरोधी पक्षनेत्याने लष्करासाठी कोणता शब्द वापरला... इ. समाजाच्या विचारात उत्तरोत्तर विकास आणि सुधारणा होते, असे समाजशास्त्र मानते. पण बहुधा भारत याला अपवाद आहे. एकेकाळी जगातील सर्वात जुनी लोकशाही परस्परांच्या लढाईमुळे शतकानुशतके परकीयांच्या गुलामगिरीत होती.आणि आता स्वातंत्र्य मिळाले तर ७० वर्षांत गरिबी, अज्ञान, वाढती गरीब-श्रीमंत दरी कमी करून उत्तम लोकशाही देण्याऐवजी लोककल्याणाशी काहीही संबंध नसलेल्या मुद्द्यांवर समाजात भांडणे आहेत. आपली विचारसरणी सुधारण्याची गरज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.