आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत सरकारच्या जल जीवन अभियानांतर्गत ग्रामीण महिलांना यापुढे पिण्याच्या पाण्यासाठी जास्त पायपीट करावी लागणार नाही. २०१९ मध्ये मिशन सुरू झाल्यापासून ग्रामीण कुटुंबांना सुलभ जीवन जगण्यासाठी ६.३७ कोटींहून अधिक नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. देशभरातील १०८ जिल्हे ‘हर घर जल’ झाले आहेत, म्हणजेच या जिल्ह्यांतील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाने पाणीपुरवठा होत आहे आणि एकही घर सुटलेले नाही. हा एक चांगला प्रयत्न आहे. जल जीवन मिशनची दृष्टीदेखील एक गंभीर विचार आहे, त्यात २०२४ पर्यंत ग्रामीण भारतातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे म्हटले आहे. आपण सर्वांनी भारतातील केदारनाथ पूर, दुष्काळ आणि जलप्रदूषण पाहिले आहे आणि निसर्गाचा असा कोप म्हणजे निसर्ग व पाण्याप्रति मानवी स्वभावाला कमी लेखण्याची एक दुःखद कहाणी आहे. केपटाऊनच्या जलसंकटामुळे आपली झोप थोडीशी भंगली असली तरी, लोक त्यांच्या भौतिकवादी दृष्टिकोनातून जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून बाहेर आले नाहीत तर बंगळुरूलाही त्याच परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे बीबीसीच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. आज भारतातील अनेक राज्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. एक बादली पाण्यासाठी लोक आपला जीव पणाला लावतात, या बीबीसी हिंदीच्या बातमीने खरोखरच माझे मन ढवळून काढले. दिल्ली असो वा खडीमल गाव, बंगळुरू असो किंवा केपटाऊन - मानव, प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती यांना पाण्याची गरज असते.
निसर्ग आपल्याला पाणी शुद्ध करण्यासाठी अनेक पर्याय देईल, पण आपण हे विसरू शकत नाही की, निसर्ग व पाणी यांच्यामध्ये मानवी महत्त्वाकांक्षेची ताकद आहे आणि भूजलामध्ये सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय फायदे आणि संधी प्रदान करण्याची क्षमता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रकल्पांनुसार २०३० मध्ये ताज्या पाण्याची जागतिक मागणी ४०% पेक्षा जास्त असेल. नवीन संशोधन अधिक चिंताजनक आहे, कारण ते १.८ अब्ज लोकांना किमान अर्ध्या वर्षासाठी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, याची पुष्टी करते. जगातील पाण्यापैकी फक्त २.५३% ताजे पाणी आहे आणि१.३ अब्ज लोकसंख्या असलेल्या भारताकडे जागतिक गोड्या पाण्याच्या साठ्यापैकी फक्त ४% पाणी आहे. अशा प्रकारे पिण्याचे पाणी आणि पिकांसाठी फक्त काही टक्के ताजे पाणी उपलब्ध आहे, ते लोकसंख्येच्या वाढीसह कमी होत आहे. हवामानातील बदल, ग्लोबल वाॅर्मिंग आणि हंगामी पर्जन्यमानातील बदल, जलवैज्ञानिक चक्रातील बदल या गंभीर परिस्थितीमध्ये भर घालत आहेत.
या पार्श्वभूमीवर जलसंकट अधिक संवेदनशीलतेने आणि सहानुभूतीने हाताळणे अत्यावश्यक आहे. माणूस नागरिकापेक्षा अधिक ग्राहक होत आहे. तो पाण्याला ब्रँड आणि कोल्ड्रिंक्स मानत आहे. झाडे तोडली जात आहेत, मोठमोठी अपार्टमेंट्स बांधली जात आहेत, अशा परिस्थितीत माणूस अधिक स्वार्थी होत चालला आहे. आधी तो पाणी प्रदूषित करतो आणि नंतर ब्रँड व्हॅल्यू देऊन विकतो. मध्यमवर्गीय ग्राहक पाण्याचा अपव्यय करण्यास मागेपुढे पाहत नाही. शहरी जीवनशैलीत पाणी ही सीलबंद बाटली आहे, तर गरिबांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. शेवटी प्रत्येकाला फक्त पाणी नव्हे, तर शुद्ध पाणी हवे असते. गरिबाच्या घरात फिल्टर कसे असेल? वाढत्या मध्यम-उच्च मध्यमवर्गाच्या प्रचंड क्रयशक्तीमुळे माणूस व निसर्ग यांच्यातील नात्यातील अयोग्यताही दिसून येते.
जलचक्र पाण्यापासून सुरू होते आणि पाण्यावरच संपते. जलव्यवस्थापन तज्ज्ञ प्रा. अर्जेन हॉकस्टेरा यांना वाटते की, पाण्याची टंचाई ही सर्व पर्यावरणीय समस्यांच्या शीर्षस्थानी आहे. या संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जलसाक्षरता आणि जलसंवेदनशीलता आवश्यक आहे. तथापि, भारतीय संविधानाने कलम ५१-ए (जी)च्या भाग IV-ए मध्ये जलशिक्षण प्रदान करण्यासाठी मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली आहेत आणि जंगले, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे, हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, अशी कल्पना केली आहे.
पाण्याचा हा पैलू ग्राहकाच्या चारित्र्याने नव्हे, तर एक प्रबुद्ध माणूस म्हणून अनुभवला पाहिजे. नाही तर निसर्गाकडून असे मिस्ड कॉल येत राहतील. लक्षात ठेवा : पाण्याशिवाय सर्व काही मृत आहे.
(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
नंदितेश निलय लेखक आणि वक्ते nanditeshnilay@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.