आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानशा करत असाल तर एका रात्रीत शंभर चंद्र दिसतील, पण ते असणार नाहीत. एकूणच, नशा लक्ष विचलित करते. आपल्या सर्वांना कुठली ना कुठली नशा असते. कुणाला शरीराची, कुणाला संपत्तीची, काहींना सत्तेची, तर काहींना शिक्षणाची नशा आहे. हे सर्व आपल्या सत्कर्माचे फळ असावे, परंतु त्यांची नशा चढताच आपण काही तरी वेगळे बनतो. हे व्यसन टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पूर्णपणे प्रेमळ, करुणेने ओतप्रोत असणे.
ईश्वराची कमाल म्हणजे चोवीस तास निसर्गाच्या प्रेमाचा वर्षाव होतो. झाडे आणि वनस्पती, सूर्य, चंद्र, नद्या हे सर्व रात्रंदिवस प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि आपण जागरूक राहिलो तर त्यांचा योग्य वापर करू शकू. स्वतःमध्ये चैतन्य जागृत करण्यासाठी, चोवीस तासांमध्ये काही काळ मौन बाळगावे लागेल. आपण विचारशून्य होतो तेव्हा आपला ऑर्बिटफ्रंटल कॉर्टेक्स (मेंदूचा भावना निर्माण करणारा भाग) सक्रिय होतो. त्याला आय सॉकेटदेखील म्हणतात. म्हणूनच आपण विचारशून्य होतो तेव्हा आपल्या मनाला खूप चांगली संधी देतो. हृदयगती थांबल्यानंतरही दोन-तीन मिनिटे मेंदूची हालचाल सुरू असल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ मेंदूमध्ये अद्भुत प्राण आहे. प्रेम ही देवाची पहिली पसंती आहे. आपण प्रेमळ झालो की कोणतीही नशा आपल्यावर वर्चस्व गाजवणार नाही. Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.