आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Ready For Your Sleep Management Plan For This Summer? | Article By N Raghuraman

मॅनेजमेंट फंडा:या उन्हाळ्यासाठी तुमचा झोपेच्या व्यवस्थापनाचा प्लॅन तयार का?

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२१ मार्चपर्यंत सर्व उत्तर भारतीयांसाठी वसंत ऋतू सुरू होईल आणि तेव्हापासून दिवस मोठा होत जाईल. जूनमध्ये उन्हाळा संपेपर्यंत हे सुरू राहील. साहजिकच यामुळे आपल्या झोपण्याच्या पद्धतीही बदलतील, कारण रात्री उष्ण असतील. अशा परिस्थितीत आपण रात्रीचा काही वेळ टीव्ही पाहण्यात किंवा फोनवर अपूर्ण काम पूर्ण करण्यात घालवू शकतो आणि सकाळी ८-९ पर्यंत ६-७ तासांची झोप पूर्ण करू शकतो. ज्यांना ऑफिसच्या कामाची घाई नाही, त्यांची दिवसभराची झोप वाढू शकते. मग उशिरापर्यंत झोपणे आणि दिवसा झोप पूर्ण करणे योग्य आहे का? तज्ज्ञ म्हणतात, नाही. यासाठी त्यांनी दिलेली कारणे अनेक आहेत. ती समजून घेऊया. प्रत्येक सजीवाच्या शरीरात एक सर्केडियन रिदम असतो, त्याला २४ तासांचे आंतरिक घड्याळ म्हणतात. सर्केडियन रिदम शारीरिक, मानसिक आणि वर्तनात्मक असतात. पृथ्वीवरील प्रत्येक प्रजातीप्रमाणे मानवसुद्धा अंधार पडताच झोपी जातो आणि सकाळी उठतो. याचे आपण दीर्घकाळ पालन केले. महाभारताच्या काळात तर सूर्यास्तानंतर युद्धावरही बंदी होती. कारण अंधारात झोपताना मेंदू मेलाटोनिन नावाचा हार्मोन तयार करतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, रात्रीच्या वेळी प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने मेलाटोनिनच्या उत्पादनात अडथळा येतो. याचा परिणाम शरीराच्या सर्केडियन रिदमवर आणि झोपेच्या चक्रावर होतो आणि परिणामी शरीराच्या संपूर्ण कार्यावर परिणाम होऊ लागतो. कसे? मेलाटोनिनशी संबंधित दोन मुख्य स्थितींना हायपोमेलाटोनिनेमिया आणि हायपरमेलाटोनिनेमिया म्हणतात. हायपोमेलाटोनिनेमियामध्ये तुम्हाला झोपेच्या विकाराच्या प्रगत पातळीचा सामना करावा लागतो, यामध्ये तुम्ही संध्याकाळी लवकर झोपता, म्हणजे ६ ते ९ वाजेपर्यंत आणि पहाटे २ ते ५ च्या दरम्यान जागे होता. अशा लोकांना २४-आवर स्लीप-वेक सिंड्रोमचा त्रास होतो, याचा अर्थ त्यांच्या झोपेच्या वेळा सारख्याच असतात, परंतु त्यांचे अंतर्गत घड्याळ २४ तासांपेक्षा अधिकचे असते. याचा झोपेच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो आणि उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, इन्सुलिन-प्रतिरोध यांसारख्या समस्या निर्माण होतात. दुसरीकडे रात्रीच्या वेळी मेलाटोनिनची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते तेव्हा हायपरमेलाटोनिनेमिया होतो. यामुळे दिवसा झोप येणे, शरीराचे तापमान कमी होणे आणि स्नायूंची झीज होते. बरेच लोक लवकर झोपतात, तरीही त्यांच्या मनात विचार येत राहतात, यामुळे त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. श्री श्री रविशंकर म्हणतात त्याप्रमाणे, आपला खरा जीवनसाथी शरीर आहे. तुम्ही तुमच्या शरीराची जितकी काळजी घ्याल तितकी शरीर तुमची काळजी घेईल. रात्रीचे जेवण लवकर करा आणि ९ ते १० च्या दरम्यान अंधाऱ्या खोलीत झोपा.मेलाटोनिनची पातळी बदलण्याची वेळ आली आहे. पिनियल ग्रंथी अंधारात सर्वाधिक मेलाटोनिन तयार करते, तर प्रकाशात उत्पादन कमी होते. यामुळे तुमची कामगिरी नियमित राहते. {फंडा असा की, चांगल्या दर्जाचे अन्न, पाणी, झोप यासाठी आपण चांगले नियोजन केले तर आपल्या अनेक समस्या आपोआप संपतील किंवा त्यांचा आपल्यावर अजिबात परिणाम होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...