आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवळाच्या प्रांगणात गेल्यावर मन भडकले, कटू आठवणी दाटून आल्या, शारिरीक वेदना खूप वाढल्या तर येणारी पिढी मंदिरात जाणे टाळेल. आज आपण मंदिरांमध्ये पाहत असलेली गर्दी निराश होईल. सध्या देशात जमाव संस्कृती सुरू आहे. प्रत्येक घटना, कार्यक्रमाचे ध्येय एकच असते - गर्दी. राजकारणी लोकांची गर्दी जमवतात हे समजण्यासारखे आहे, वक्त्याने आपल्या श्रोत्यांची गर्दी जमवायला हरकत नाही. पण, केवळ मंदिर दर्शनासाठीच गर्दी खेचली जात असेल तर देवाला हे मान्य होणार नाही. गर्दी पुलावर असो वा मंदिराच्या प्रांगणात, धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. त्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित लोक सतत बेफिकीर असतात. विचारांची कोंडी झाली की तर माणूस वेडा होतो. धार्मिक स्थळांवर वाहनांची कोंडी होते, तेव्हा माणूस वेड्यासारखा होतो. देवळांचा आनंद कोंडीच्या दु:खात बदलतो. मंदिरे प्रेक्षणीय करणाऱ्यांना गर्दी आवरताही आली पाहिजेे. अन्यथा पुण्य करता करता अचानक पाप सुरू होईल.
पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.