आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्याला प्रार्थना आणि स्तुती दोन्हीतील फरक समजून घ्यायला हवा, कारण वेगवेगळ्या वेळी आपण दोन्हींतून जातो. प्रार्थनेत आपण परमेश्वराकडून काहीतरी मागतो. या वेळी आपल्यात दीन भावना, अपेक्षा जास्त असू शकतात. मात्र जेव्हा आपण स्तुती करतो तेव्हा ईश्वराच्या त्या रूपाची आठवण करतो ज्यात कृपेचा वर्षाव होतो. स्तुती करताना दोन लक्षणे आपल्या शरीरात हवीत - वाणी गदगद आणि शरीर उल्हसित व्हायला हवे. एक-एक शब्द असा निघावा जसा मस्तीत सहजपणे आतून बाहेर यावा. येथे शब्दांची जादू नसावी. कलाकुसर करत शब्द सजवले नसावेत. एकवेळ प्रार्थनेचे आयोजन होईल. मात्र, स्तुतीत फक्त आनंदच असावा. श्रीरामाचे कौतुक वेदांनी केले आणि वेद गेल्यानंतर शंकर भगवान आले. तुलसीदास लिहितात, बैनतेय सुनु संभु तब आए जहं रघुबीर। बिनय करत गदगद गिरा पूरित पुलक सरीर॥ काकभुशुण्डिजी कह रहे हैं- तेव्हा भगवान शंकर आले आणि गदगद होत श्रीरामची स्तुती करू लागले. त्यांचे शरीर उल्हसित झाले. म्हणजे वाणीत रस होता आणि शरीर भावनेत बुडाले होते. स्तुती अशीच केली जायला हवी.
Facebook:Pt. Vijayshankar Mehta पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.