आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृत्तवेध:नेत्यांची संपत्ती, निवडणूक हंगाम अन् सामान्य माणूस

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी नेत्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होत असते. दर पाच वर्षांनी ते त्यांच्या मालमत्तेचा तपशील निवडणूक आयोगाला देतात, पण मालमत्तेची ही आकडेवारी सार्वजनिक करण्याशिवाय आयोग काहीही करू शकत नाही. मतांची गरज असते तेव्हा निवडणुका जिंकायच्या असतात, तेव्हा मोठमोठी आश्वासने देतात, उदा. ओसाड जमिनीवर पीक लावू, झाडे लावून त्यांच्या फांद्यांवर फुले फलवू, पर्वत सुबकपणे सजवू, त्यावर चंद्र लटकवू, प्रत्येकाच्या डोक्यावर निळे आकाश पसरवू, तारे प्रकाशित करू, वाऱ्याला गती देऊ. उड्या मारणाऱ्या दगडांना आम्ही पंखही लावू... आणि त्याहीपेक्षा रस्त्यावर फिरणाऱ्या सावल्यांमध्येही जीव ओतू... आणि आणखी काहीबाही! पण, निवडणूक जिंकल्यावर बहुतांश नेत्यांना आपली संपत्ती वाढवण्याशिवाय काही सुचत नाही. ज्याच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असेल त्याला निवडणूक लढवू देता कामा नये. त्याला अपात्र ठरवावे. दुसरीकडे, मालमत्ता जाहीर करतानाही अनेक त्रुटी राहतात. कारखाने, इमारती, व्यवसाय हे नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींच्या नावावर असतात, एखाद्या खात्याने याचाही शोध घ्यावा. वरून ते स्वतःच प्रस्ताव आणून आपले पगार वाढवतात आणि भत्तेही. त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाण्यासाठीही भत्ता मिळतो. किती जण जातात हे सर्वांना माहीत आहे. सर्वसामान्यांची स्थिती जाणून घेण्यात त्यांना काहीही रस नसतो. नेत्यांच्या या स्वभावाने किंवा सवयीने सामान्य माणसाला गप्प केले आहे. माझे मौन ऐकण्याआधी हे सर्व नेते बहिरे झाले तर बरे होईल, अशी त्याची इच्छा असते. या सामान्य माणसात सहिष्णुता खूप आहे. सांगण्यापुरते फक्त पायात रस्ता व डोक्यावर आभाळ सोडले आहे. आणखी काही नाही. निवडणुकीच्या वेळी या भागात येण्याचे असे आश्वासन देतात की, जणू पाच वर्षे इथेच राहणार. येतील वेळ मिळेल तेव्हा. वेळ नसेल तरी येतील. जरूर येतील. जशी शरीराची सर्व शक्ती येते हातात. जसे रक्त येते रंगात. जशी धग येते चुलीत. असे येतील. पण, कोणीच येत नाही. स्थिती कोणीच जाणून घेत नाही. कधी कधी कुणी परिस्थिती सांगितली तरी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात. लोक गप्प होतात. असा विचार करून की, या राजकारण्यांकडे पोलादाचे बूट असतात. अखेर मुंग्यांचे रडणे कोण पाहतो आणि ऐकतो? एकूणच, राजकारणाच्या या दुष्टचक्रात राजकारण्यांच्या अक्षौहिणी फौजांमध्ये सामान्य माणूस अभिमन्यूसारखा वेढलेला आहे. वारंवार येणाऱ्या निवडणुकीच्या हंगामाने तो कंटाळला आहे. निवडणुकीच्या हंगामावरून एका प्रसिद्ध कवीची ही कविता आठवली ः मुझे अच्छा नहीं लगता ये मौसम, हमारी आंखों में जो धूल झोंके! हमारी लड़कियों के लहंगे पकड़े, हमारे पेड़ों पर कोड़े लगाए, और वे चीखा करें! मुझे नफरत है इस मौसम से, जिसमें, झुकानी पड़ती है अपनी राय, नेताओं की चलती हवा पर।

नवनीत गुर्जर navneet@dbcorp.in