आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात BGT कसोटी मालिका खेळवली जात आहे. सध्या या मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरू आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन एका भारतीय खेळाडूकडे दुर्लक्ष करत आहे.
या मालिकेत कसोटी पदार्पण
ज्या फलंदाजाचा उल्लेख केला जात आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून टी-20 सामन्यात धावांचा पाऊस पाडणारा सूर्यकुमार यादव आहे, ज्याला भारताचा 'मिस्टर 360 डिग्री' फलंदाज म्हणूनही ओळखले जाते.
मुंबईच्या या धडाकेबाज फलंदाजाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात कसोटी पदार्पण केले. मात्र त्यानंतर कर्णधार रोहितने त्याला उर्वरित तीन सामन्यांमध्ये संधी दिली नाही. तो नागपुरात खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा भाग होता आणि त्याने फक्त 8 धावा केल्या.
रोहित आणि टीम मॅनेजमेंटचे दुर्लक्ष!
कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादवकडे दुर्लक्ष केले असे म्हणणे योग्य ठरणार नाही. पण सूर्यकुमार यादवचे चाहते सोशल मीडियावर त्याच्याबद्दल खूप बोलत आहेत. चाहत्यांना वाटते की रोहितने त्याला अहमदाबाद कसोटी सामन्यात नक्कीच संधी द्यायला हवी होती. मात्र, टीम मॅनेजमेंटने त्याच्यापेक्षा श्रेयस अय्यरला प्राधान्य दिले. कारण श्रेयसला नागपूर कसोटी सामन्यात संधी मिळाली नव्हती त्यामुळे त्याला अहमदाबादच्या कसोटीत संधी देण्यात आली.
आतापर्यंत सुर्याने 69 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत
सूर्यकुमार यादवने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 69 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एक कसोटी, 20 एकदिवसीय आणि 48 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 28.86 च्या सरासरीने एकूण 433 धावा केल्या आहेत तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 1675 धावा केल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.