आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या सात शतकांमध्ये 150 पेक्षा जास्त धावा करणारा सरफराज खान हा पहिला खेळाडू बनला आहे. सरफराजने गेल्या 13 डावांत सहा शतके झळकावली आहेत. मुंबईचा फलंदाज सरफराज खानने रणजी ट्रॉफीमध्ये आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. सरफराजने रणजी ट्रॉफी 2022 च्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंड विरुद्ध शतक झळकावले आहे.
सरफराजने 140 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. तो या हंगामात रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. सरफराजने आता या हंगामात रणजीमध्ये 600 हून अधिक धावा केल्या आहेत. सरफराजचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सातवे शतक आहे. 153 धावांची खेळी खेळून तो बाद झाला.
आपल्या शतकादरम्यान त्याने 205 चेंडूंचा सामना केला आणि 14 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याने गेल्या पाच डावात 156 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो ठरला पहिला फलंदाज
विशेष म्हणजे सरफराज प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या सात शतकांमध्ये 150 पेक्षा जास्त सर्व धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये सरफराज खानने गेल्या 13 डावांमध्ये सहा शतके झळकावली आहेत. यामध्ये एक तिहेरी शतक, 3 द्विशतके, 150 हून अधिक धावा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
गेल्या 13 रणजी डावांमध्ये त्याने सहा वेळा 150 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. सरफराजने रणजी ट्रॉफी 2022 मध्ये आतापर्यंत 275, 63, 48, 165 आणि 153 धावा केल्या आहेत.
अशी कामगिरी करणारा डॉन ब्रॅडमननंतरचा ठरला दुसरा फलंदाज
सरफराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने या धावा 80+ च्या सरासरीने केल्या आहेत, जे डॉन ब्रॅडमन यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम सरासरी आहे. ब्रॅडमन यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 95.14 च्या सरासरीने 2000 धावा पूर्ण केल्या.
त्याच वेळी, विजय मर्चंटने 71.64, जॉर्ज हेडलीने 69.86 च्या सरासरीने आणि बहिर शाहने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 69.02 च्या सरासरीने 2000 धावा पूर्ण केल्या.
IPL मध्ये ठरला अपयशी, या रणजी हंगामात गाजवले वर्चस्व
सरफराज खान या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, त्याने आतापर्यंत चार सामन्यांच्या 5 डावात 704 धावा केल्या आहेत. रणजी ट्रॉफीपूर्वी, सरफराज खान IPL-2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. तिथेही त्याने प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला.मात्र त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत.
रणजी ट्रॉफीतील अप्रतिम खेळ पाहून लोकांनी सरफराजचा भारताच्या कसोटी संघात समावेश करावा, असे आवाहन निवडकर्त्यांकडे सुरू केले आहे. सोशल मीडियावर लोक सरफराजचे कौतुक करताना दिसत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.