आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष रमीझ राजा म्हणाले - जर 2023 आशिया कप पाकिस्तानमध्ये आयोजित केला गेला नाही तर त्यांचा संघ टूर्नामेंट खेळणार नाही. केवळ टीम इंडिया पाकिस्तानात येऊ शकत नाही म्हणून स्पर्धेचे ठिकाण बदलू नये. भारत आला नाही तर काही हरकत नाही, पण स्थळ बदलले जावू नये, जर स्थळ बदलले तर सर्वप्रथम पाकिस्तान संघ स्पर्धेतून आपले नाव मागे घेईल.
भीक मागितल्याप्रमाणे काही होस्टिंगचे अधिकार मिळाले नाहीत
रावळपिंडी येथे इंग्लंड-पाकिस्तान कसोटी सामन्यादरम्यान PCB प्रमुख म्हणाले - आम्ही स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी काही एवढे उतावीळ झालो नाही. आम्हाला भीक मागीतल्यामप्रमाणे होस्टिंगचे अधिकार मिळाले नाहीत. ICC च्या न्याय्य प्रक्रियेतून आम्हाला आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी मिळाली आहे.
आशिया चषक 50 षटकांचा असेल
2023 आशिया कप सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये भारतात वनडे विश्वचषक होणार आहे. वनडे विश्वचषकामुळे यावेळी आशिया चषक 20 ऐवजी 50 षटकांचा असेल. शेवटचा आशिया चषक ऑगस्ट 2022 मध्ये UAE मध्ये होणार होता, पण यजमानपद श्रीलंकेकडे होते. वास्तविक त्यांच्या देशातील राजकीय अनागोंदीमुळे स्थळ बदलावे लागले.
PHO
ACB अध्यक्ष म्हणाले - स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित केली जाईल
आशिया क्रिकेट बोर्डाचे (ACB) अध्यक्ष जय शाह म्हणाले होते की, राजकीय कारणांमुळे टीम इंडिया पाकिस्तानला जाऊ शकत नाही. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, परंतु स्पर्धेचे स्थान बदलून सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात. शाह हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिवही आहेत.
पाकिस्तान वनडे विश्वचषकही खेळणार नाही!
शाह यांच्या वक्तव्यानंतर भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते - गृह मंत्रालयाच्या परवानगीनंतरच टीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूला पाकिस्तानात पाठवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
यानंतर PCB प्रमुख म्हणाले होते की, जर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळणार नाही तर पाकिस्तानही भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही.
2008 पासून टीम इंडिया पाकिस्तानला गेलेली नाही
2008 मध्ये आशिया चषक खेळण्यासाठी टीम इंडिया शेवटच्या वेळी पाकिस्तानला गेली होती. त्याच वेळी, पाकिस्तानचा संघ शेवटच्या वेळी 2016 मध्ये टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता.
2022 मध्ये दोन्ही संघ 3 वेळा आमनेसामने आले आहेत. आशिया चषकादरम्यान दुबईमध्ये दोनदा आणि टी-20 विश्वचषकादरम्यान मेलबर्नमध्ये दोनदा दोन्ही देशांमधील क्रिकेट सामने झाले.
शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये झाली होती
2012 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमध्ये द्विपक्षीय मालिका झालेली नाही. त्यानंतर पाकिस्तान 3 वनडे आणि 2 टी-20 सामने खेळण्यासाठी भारतात आला. त्याचवेळी टीम इंडिया शेवटची कसोटी मालिका खेळण्यासाठी 2007 मध्ये पाकिस्तानला गेली होती. 2012 नंतर, दोन्ही संघ फक्त ICC बहुराष्ट्रीय स्पर्धा आणि आशिया कपमध्ये आमनेसामने खेळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.