आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौतमची 'गंभीर' प्रतिक्रिया:टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर केले ट्विट, सोशल मीडियावर व्हायरल

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव झाला. या पराभवामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांची अवस्था फारच वाईट होती. टीम इंडियाच्या गोलंदाजाना इंग्लंडची एकही विकेट घेता आली नाही.

टीम इंडियाच्या पराभवानंतर भारताचा माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीरने एक गंभीर ट्विट केले आहे जे खूप व्हायरल होत आहे. गंभीरने ट्विटमध्ये लिहिलेल्या गोष्टी वाचून चाहत्यांच्याही खूप प्रतिक्रिया येत आहेत. एका ट्विटमध्ये गंभीरने सहज लिहिले, 'तुम्ही फक्त त्यांच्याकडूनच अपेक्षा करता जे नेहमी परफॉर्म करू शकतात! भारताच्या माजी सलामीवीर फलंदाजाचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

फक्त 3 फलंदाजाची चलती

या विश्वचषकात टीम इंडियाकडून फक्त कोहली, हार्दिक आणि सूर्यकुमार यादव हेच परफॉर्म करताना दिसले होते. या स्पर्धेत रोहित शर्माची बॅट पूर्णपणे शांत राहिली. उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव होण्यामागे रोहितचा या स्पर्धेतील फ्लॉप हेही महत्त्वाचे कारण ठरले.

सामना गमावल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले की, इंग्लंडचे खेळाडू जोस बटलर आणि एलेक्स हेल्स यांना ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग (बीबीएल) मध्ये खेळण्याचा त्यांना नक्कीच फायदा झाला.

गुरुवारी झालेल्या टी20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव झाला. त्यात हेल्स-बटलर यांना दिमाखदार विजयाची नोंद केली. बटलर (नाबाद 80) आणि हेल्स (नाबाद 86) यांनी अवघ्या 16 षटकांत 169 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

हेल्सने इंग्लंड संघात सर्वाधिक BBL सामने खेळले आहेत, तो मेलबर्न रेनेगेड्स आणि सिडनी थंडरकडून खेळला आहे. या स्पर्धेतही त्याचा परिणाम नक्कीच दिसून आले.

यापूर्वी गौतम गंभीरने केले सूर्यकुमार यादवचे जोरदार कौतुक केले

टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव 2022 च्या T20 विश्वचषकात आपल्या बॅटने खळबळ माजवत आहे. शेवटच्या दिवशी म्हणजेच 6 नोव्हेंबर रोजी झिम्बाब्वे विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजीचे दर्शन घडवले होते. त्याची झंझावाती खेळी पाहून प्रत्येकाला त्याच्या फलंदाजीचे वेड लागले आहे. त्याचवेळी भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने त्याच्या झंझावाती खेळीचे कौतुक केले आणि त्याला रोहित-कोहलीपेक्षा खूप वेगळा खेळाडू म्हटले.

“विराट कोहली, केएल राहुल आणि रोहित शर्मासारखे खेळाडू खूप पारंपारिक आहेत. सूर्यकुमार यादव हा इतरांपेक्षा वेगळा. त्यांच्या खेळाचा आनंद घ्या, पहा आणि आनंद घ्या. कारण तुम्हाला असे खेळाडू मिळत नाहीत. भारतात असा खेळाडू पूर्वी कधीच नव्हता."

बातम्या आणखी आहेत...