आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडर-19 वर्ल्ड कपवविषयी जाणून घ्या सर्वकाही:16 देशांचे संघ खेळणार 48 सामने, भारत-पाकिस्तान सामना होणार का?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 9 जानेवारीला अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सराव सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. यासोबतच 11 जानेवारीला भारताचा दुसरा सराव सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या मेगा-टूर्नामेंटबद्दल आम्ही तुम्हाला सर्व माहिती सांगत आहोत. ही माहिती जाणून घेतल्यानंतर अंडर-19 वर्ल्ड कपबद्दल तुमची उत्सुकता आणखी वाढेल.

कोण असेल होस्ट, किती संघ सहभागी होतील?
अंडर-19 वर्ल्ड कप 2022 वेस्ट इंडिजमध्ये आयोजित केला जात आहे. वेस्ट इंडिज प्रथमच अंडर-19 विश्वचषकाचे आयोजन करत आहे. ही स्पर्धा 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. यामध्ये 16 देशांचे संघ सहभागी होत आहेत. फायनलसह 48 सामने होणार आहेत. सराव सामन्यांनंतर भारत 15 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळेल. भारताला ब गटात ठेवण्यात आले आहे. या गटात दक्षिण आफ्रिकेशिवाय आयर्लंड आणि युगांडाचे संघ आहेत.

न्यूझीलंडच्या जागी स्कॉटलंडचा समावेश
न्यूझीलंड यावेळी अंडर-19 विश्वचषकात सहभागी होणार नाही, कारण पुनरागमनानंतर क्वारंटाईनचे नियम पाळावे लागतील यामुळे किवी संघ विश्वचषकात सहभागी होणार नाही. त्याच्या जागी स्कॉटलंडचा संघ खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसह स्कॉटलंड ड गटात आहेत.

कोणते संघ कोणत्या ग्रुपमध्ये आहेत

  • ग्रुप ए – बांगलादेश, इंग्लंड, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती
  • ग्रुप बी – भारत, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, युगांडा
  • ग्रुप सी – अफगाणिस्तान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, झिम्बाब्वे
  • ग्रुप डी – ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज

भारतीय संघ सर्वाधिक विश्वचषक जिंकणारा संघ
भारतीय संघ हा अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर, 2016 आणि 2020 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेच्या मागील आवृत्तीत भारत उपविजेता ठरला आहे.

लाईव्ह सामने कोठे पाहू शकता?
तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर अंडर-19 विश्वचषक सामने थेट पाहू शकता. त्याच वेळी, सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर असेल.

भारताचा पाकिस्तानसोबत सामना होईल का?
भारत आणि पाकिस्तान साखळी सामन्यांदरम्यान भिडणार नाहीत. दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात आहेत. हे दोन संघ उपांत्य फेरीत आमनेसामने येऊ शकतात. यासाठी दोन्ही संघांना आपापल्या गटात क्रमांक-1 किंवा क्रमांक-2 वर राहावे लागेल.

विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे आहे: यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना (विकेटकीपर), आराध्य यादव (विकेटकीपर), राज अंगद बावा, मानव प्रकाश, कौशल तांबे, आर.एस.हंगारेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रविकुमार, गर्व सांगवान.