आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला विश्वचषकाच्या 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 6 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 278 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तरात कांगारू संघाने 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. कर्णधार मॅन लॅनिंगने (97) सर्वाधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील हा सलग पाचवा विजय आहे.
सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला जिंकावे लागतील दोन्ही सामने
टीम इंडियाला विश्वचषकातील उर्वरित दोन्ही सामने बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचे आहेत. टीम इंडियाला हे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आफ्रिकन संघाने आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकले आहेत. भारतीय महिला संघाने बांगलादेशविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवल्यास रनरेट त्याचा फायदा होईल.
20 व्या षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला झटका
20व्या षटकात 121 धावांवर ऑस्ट्रेलिया संघाची पहिली विकेट पडली. स्नेह राणाने अॅलिसा हिलीला मिताली राजकडे झेलबाद केले. हीलीने 65 चेंडूत शानदार 72 धावा केल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना टीम इंडियाने 277/7 अशी धावसंख्या उभारली. कर्णधार मिताली राजने (68) सर्वाधिक धावा केल्या. यास्तिका भाटियाने 59 आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद 57 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डार्सी ब्राऊनने 3 बळी घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.