आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्डकप /:इंग्लंडकडून भारत पराभूत, रविवारी अंतिम सामना

मेलबर्न4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी गुरुवारचा दिवस वाईट स्वप्नासारखा होता. टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने टीम इंडियावर १० गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. कोहली (५०) आणि पंड्या (६३) यांच्या अर्धशतकांखेरीज कुणीच चांगली कामगिरी केली नाही. इंग्लंडने १६ षटकांतच aही गडी न गमावता १६९ धावांचे लक्ष्य गाठले.

टी-२० वर्ल्डकपच्या १६ उपांत्य सामन्यांत प्रथमच एखादा संघ १० गड्यांनी पराभूत {आतापर्यंत ८ टी-२० वर्ल्डकपच्या १६ उपांत्य सामन्यांत प्रथमच एखादा संघ १० गड्यांनी विजयी झाला. {इंग्लंडने सर्वात कमी षटकांतील विजयाची बरोबरीही केली. टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने २०१० मध्ये १६ षटकांत लंकेला हरवले होते. {रविवारी पाक व इंग्लंड यांच्यात दुपारी १:३० वाजता फायनल. चुकीचे ठरलेले ३ निर्णय... {युजवेंद्र चहलला न खेळवणे. {कार्तिकऐवजी पंतला संधी देणे. {अर्शदीपला दुसरे षटक न देणे. सामना गमावणारे ३ टर्निंग पाॅइंट... {राहुल दुसऱ्याच षटकात बाद. {रोहितच्या २८ चेंडूंत २७ धावा. {सूर्यकुमारच्या केवळ १४ धावा.

अकराव्या षटकात सूर्यकुमार बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या मैदानात उतरला. तोपर्यंत भारताची धावसंख्या कमी होती. मात्र, कोहली आणि पंड्याने चौफेर फटकेबाजी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली.

बातम्या आणखी आहेत...