आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायशस्वी जायस्वालने आपली लय कायम ठेवताना दुसऱ्या डावात शतकी खेळी करत शेष भारताचा विजयाचा दावा मजबूत केला. याच खेळीच्या बळावर मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखााली शेष भारत संघाने शनिवारी इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत मध्य प्रदेश संघाला विजयासाठी ४३७ धावांचे खडतर टार्गेट दिले. शेष भारत संघाने दुसऱ्या डावात २४६ धावा केल्या. यादरम्यान यशस्वीने एकाकी झंुज देताना १४४ धावांची खेळी केली. आता खडतर लक्ष्याचा पाठलाग करताना मध्य प्रदेश संघाची निराशाजनक सुरुवात झाली. संघाचा सलामीवीर अरहम शून्यावर बाद झाला. त्यामुळे संघाला दुसऱ्या डावात दिवसअखेर २ बाद ८१ धावा काढता आल्या. अद्याप ३५६ धावांनी पिछाडीवर असलेल्या मध्य प्रदेश संघाचा कर्णधार हिमांशू (५१) आणि हर्ष गवळी (१५) मैदानावर कायम आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.