आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Team India Playing 11 Announced For World Test Championship India Vs New Zealand WTC Final News Updates

WTC फायनलसाठी भारतीय संघ घोषित:2 स्पिनर आणि 3 पेसर्ससह उतरणार भारतीय संघ; जडेजा, बुमराह आणि शमीचे ऑस्ट्रेलिया सीरीजनंतर पुनरागमन

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अश्विन आणि जडेजा स्पिन डिपार्टमेंट सांभाळतील.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जूनपासून साऊथॅम्प्टनच्या एजिस बाऊल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यासाठी टीम इंडियाचा प्लेइंग -11 घोषित करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ 2 फिरकी गोलंदाज आणि 3 वेगवान गोलंदाजांसह येणार आहे.

अश्विन आणि जडेजा स्पिन डिपार्टमेंट सांभाळतील. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्यावर असेल. रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंग करतील. ऑस्ट्रेलिया सीरीजनंतर बुमराह, जडेजा आणि शमीचे संघात पुनरागमन झाले आहे. जडेजा आणि शमी हे दुखापतीनंतर डिसेंबरमध्ये मालिकेच्या बाहेर पडले होते. तर ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर बुमराहने लग्नासाठी मोठी रजा घेतली होती.

यांच्यावर आहे भारतीय संघाला ट्रॉफी मिळवण्यासाठी जबाबदारी
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

सलामीच्या वेळी रोहितबरोबर गिल
टीम इंडियाकडून शुभमन गिल रोहित शर्मासह सलामीला येणार आहेत. सराव सामन्यात गिलने 135 चेंडूत 85 धावा केल्या आहेत. मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल यांनाही दुसरे पर्याय होते, परंतु कर्णधार कोहलीने त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही.

कसोटी स्पर्धेत रोहितने 11 सामन्यात 64.37 च्या सरासरीने 1030 धावा केल्या आहेत. तसेच 4 शतकेही केली. शुमनने 7 कसोटी सामन्यांमध्ये 34.36 च्या सरासरीने 378 धावा केल्या.

मिडिल ऑर्डरची जबाबदारी कोणावर असेल?
टीम इंडियामधील मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांच्यावर असेल. सराव सामन्यात पंतने शतकही केले आहे. त्याने 94 चेंडूंत नाबाद 121 धावा केल्या.

कसोटी स्पर्धेत कामगिरी?
कोहलीने 14 कसोटी सामन्यांमध्ये 43.85 च्या सरासरीने 877 धावा केल्या आहेत आणि पुजाराने 17 सामन्यांत 29.21 च्या सरासरीने 818 धावा केल्या आहेत. रहाणेने टीम इंडियाकडून झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक 1095 धावा केल्या. त्याने 17 कसोटीत सरासरी 43.80 राहिली. पंत सर्वाधिक धावा करणारा भारतीय विकेटकीपर आहे. त्याने 11 कसोटीत 41.37 च्या सरासरीने 662 धावा केल्या.

साऊथॅम्प्टनमध्ये केवळ 3 भारतीय 100+ धावा करू शकले
या मैदानावर केवळ 3 भारतीय फलंदाजांनी 100 हून अधिक धावा केल्या आहेत. यात कर्णधार कोहलीने 42.75 च्या सरासरीने सर्वाधिक 171 धावा तर रहाणेने 56.00सरासरीने168केल्या आहेत. तिसर्‍या क्रमांकावर पुजाराकडे 54.33 च्या सरासरीने 163 धावा आहेत. तिघांनीही साऊथॅम्प्टनमध्ये प्रत्येकी दोन कसोटी सामने खेळले आहेत.